Welcome You All

RSS

शेतकरी आणि आत्महत्या

मराटवाड्यातील सगळ्यात मागसलेला जिल्हा म्हणुन बीड जिल्हाची ओळख होते तिथे ना रेल्वे , ना कोनतच उद्योग , बहुसन्खय लोकांचा शेती किंवा उसतोड मजुर म्हणुन पश्च्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर उस तोडनी चि कामे करने , शेतातील पीक प्रामुख्याने बाजरी , ज्वारी , करडी , पाणी आसेल तर उस कींवा कापुस . माझे वय २८ , पण मला जसे कळायला लागले तसा एखदाही दुश्काळ पडलेला नाही . पण पाण्यासाटी वनवन हि आहेच ,शेतकरी हा प्रामुख्याने आपल्याच शेतात काम करतो शक्य तो दुसर्या च्या शेतात किंवा ईतर जागेवर काम करन्यास जात नाही कींवा टाळतो , याचे मुख्य कारन म्हनजे त्याची गावात आसलेली पत . कींवा पुर्वी पासुन आसलेली परंपरा मग शेतात आसे किती रुपयांचे पिक येते व त्यावर त्याचे कुटंब चालते का नाही ?
शेतकरी हा ज्यावेळस शेतात काम नसते त्या वेळेस दुसरी कामे का करत नाहीत .शेतात पेरणी केल्या नतंर , १ ते २ महिने मशागत करावी लागते , त्याच्या नतंर ४ ते ५ महीने शेतकरी घरीच बसुन असतात या वेळी घरातिल लग्न समारंभ किंवा ईतर कार्यक्रम करतात , शेतकर्याच्या घरात जर लग्न आसेल तर , ही शेतकरी आपल्या मुलिला हुन्डा म्हणुन , १००००० रु वा या पेक्षा जास्ती जास्त देतात किंवा मुलासाठी घेतात .
वरति सोने , घरात लागनार्या वस्तु , ईतर काही , किंवा बाईक वगरे .
याचे कारन म्हण्जे शेतकर्या च्या गावातली परंपरा , लग्ना च्या वेळी सगळ्या गावात चुल बन्द आमन्त्रन आसते गावची लोकस्न्ख्या कमीत कमी १००० किवा जास्ती जास्त किती ही , परत मुलाकडची मन्डळी ट्र्कनेच लग्नासाटी येतात , कमीत कमी २ ट्र्क किवा जास्ती जास्त किती हि, हे सारे कर्ताना शेतकरी शक्यतो गावातिल एका मोट्या शेतकर्या कडुन व्याजाने रुपये घेतो ,
मग व्याज व मुद्दल त्याच्याकडुन फेडले जात नाही , तो व्यतित होतो व व्यसानाच्या आहारी जातो , व्यसानाच्या आहारी गेल्या नन्तर काही दिवसानी त्याच्या आसे लक्षात येते कि आपली दुसरी मुलगी कींवा मुलगा लग्नाच्या वयात आला आहे , मग तो शेती विकुन लग्न कर्तो ,राहिलेल्या शेती वर त्याची उपजिवीका होत नाहि व शेतकरी बाहेर हि कामाला जात नाही ....?
आता अनुदानाची गोष्ट सागतो , भहुसन्ख शेतकर्या अनुदान मिळते च मग शेतकरी हि आनेक प्रकरने सरकारी कर्याल्यात खोटिच दाखवतो ,आती वॄष्टि झालि यांना अनुदान , कमी पाउस यांना अनुदान , पिकावर रोग पडला यांना अनुदान, सारकारी आधिकारी ही थोडे फार पैसे घेउन फाइल मन्जुर करतात .
विविध बॅन्केचे काढलेल कर्ज हि तो फेडत नाही .अनुदाने , कर्ज , काढुन तो पैसे स्त्कार्याला लावत नाही ,
त्या पैस्यातुन तो मुला करीता बाईक घेतो , पत्ते खेळतो दारु पितो , देवाच्या वारया करतो , व ईतर ही गोष्टी करतो .
शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुरच काम करतात , मि ज्या वेळी गावाकडे जातो त्या वेळेस शेतकर्या चि ही मुले आपल्या गाडीवर फिरत आसतात .
शेतकरी हि शेतापेक्षा ईतर जागेवच जास्त वेळ घालवतात , आज हि मी सांगु शकतो कि शेतकर्या च्या शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुर च काम करतात , तिसरे कारन शेत मजुर एक वेळेस उपाशी राहिन पण आपल्या मुलाला शिक्षण देइल , शेतकर्या चे तसे नाही मुलगा शिकला तर शिकला नाही तर आहे आपली शेती आहेच , माझेच उद्दा देतो माझ्या गावात माझ्या वयाची १६० मुले आसतिल पण त्यातिल फक्त मी गावाच्या बाहेर शक्षिण घेतले जवळ पुरेसे पैसे नसतांना हि लोकांच्या मदतिवर ,मग हि मुले शिक्षण का घेत नाहित , याचे मुख्य कारन शेति कींवा त्यांचा पुर्वि पासुन आसलेला समज कि आपल्याला काय कमी आहे . शेत मजुराचे तसे नाही त्यांच्या कडे उपजिवीके चे साधन नसते त्या मुळे ते आपल्या मुलाला शिक्षण देतात आणि ति मुले आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज हि करतात , आसो.......
ज्या शेतकर्या कडे सुरवातिला ५ एकर जमिन होती आता त्यांच्याकडे १ एकर हि राहिलि नाही , कारन कुटंबाचा केलेला विस्तार , शेतकर्याला कमित कमी २ आणि जास्तीत जास्त ५ ते ६ मुले आसतात , एकत्र कुटुंब पध्दत आता खेडयात ही राहिली नाही , त्या मुळे त्याच्याकडे आसनार्या शेताची विभागनी होते ,
मग १ एकरात आसे किती पिक येनार , त्यात त्याचे घरही चालत नाही व तो दुसरी कडे कामाला जात नाही . आसे होत आसतांनाच त्या शेतकर्या च्या घरचे एखादे लग्न कींवा एखादा समारंभ निघतो व तो पुन्हा कर्जा ने पैसे काढतो व ते फेडता नाही आले कि आपली आहे ति शेती विकुन टाकतो मग पुढे काय ....
आजकाल तर शेतकरी कोणत्याही बँकचे कर्ज हि फेडत नाही उलट कर्ज माफीची वाट पाह्तो , कींवा सरकारी अनुदाने लाटत आसतो , खोटी कागद पत्रे सादर करुन .
तुम्हाला जर हे खोटे वाटत आसेल तर तुम्ही प्रत्यक्ष कधितरी मराटवाडयातील एखादया खेडे गावात जाउन यावे .
सरकार भरपुर अनुदान देते उदा : गाई , मह्से, शेळी , कोबडी , मत्सपालन , वुर्क्ष रोपन , यावर सरकार अनुदान देते , पन शेतकरी काय करतात ज्यावेळेस बँकेचे कींवा सरकारी आधिकारी चोकशी साठी येतात त्या वेळेस शेतकरी दुसरयाचिच , गाय , शेळी दाखवुन बँके चा पैसा उचलतात सरकारी आधिकारी ही थोडेफार पैसे घेउन फाइल मंजुर करतात.
मग शेतकरी घेतलेल्या कर्जतुन ना शेतीला पुरक व्यावसाय करतो , ना बॅंकेचे कर्ज फेडतो यातच तो कर्जबाजारी होतो मग पुढे काय ......
पण माझ्या गावात आसेही काहि शेतकरी आहेत की ज्यांना ना अनुदान मिळते ना कोनत्या बँकेचे कर्ज मिळते
बिचारे ६ महिने शेतात काम करुन उरलेले ६ महिने उसतोडनी साठी जातात आणी त्यातुन आलेल्या पैसे तुन आपल्या मुला मुलीचे लग्न करतात.
बरे शेतकर्याने आत्महत्या केली तर त्याचि खरी कारने शोधली जात नाहित
उदा :
१ ) शेतकर्याने का आत्मह्त्या केली ?
२ ) त्याने कोणत्या बँकेचे कर्ज काढले होते , व ते कशासाटी काढले , ज्याच्यासाठी काढले त्याचा त्याने त्याच कारना साठी उपयोग केला होता का ?
३ ) त्याने कर्ज कधी काढले , बँकेचे हाफ्ते भरले होते का ?
४ ) कर्ज काढल्या पासुन त्याने शेतात कोणकोणती पिके घेतली होती , व ति पिके वाया गेली होति का ?
५ ) शेतकरयाला कोणते व्यसन होते का ?
६ ) शेतकर्या च्या कुटुंबात कीती व्यक्ति आहेत , व ति कोणती कामे करतात , कि घरीच बसुन आसतात ?
७ ) शेतकर्या चे घरातील काही प्रोबलेम होते का ?
८ ) शेतकर्या ने नेमके कशासाटी कर्ज काढले होते ?
९ ) शेतकर्याने या आधि जमिन विकली होती का व का विकली कारने दया ?
१० ) शेतकर्याच्या घरात एखादे लग्न , कींवा एखादे मोटा समारंभ झाला आहे का ?
वरिल कारना चा विचार न करता शेतकर्या ने आत्मह्त्या केली , ति कशामुळे , का , याचा शोध न घेता लगेच त्याने कर्जा मुले आत्मह्त्या केलि आसे म्हणुन विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष त्यावर राजकारण करतात .
बरे शेतकर्याने शेतिसाठी कर्ज काढले तर ते कोनत्या कारना साठी
उदा :
१ ) बि बियाने , खते , किटक नाशके ,
२ ) नागरनी , फवारनी
३ ) मशागत , शेतमजुरी
४ ) विद्दुत पंप , कींवा शेतात पाइप लाईन
५ ) विद्दुत जोडनी
६ ) बैल , गाय , शेळी, म्हैस , कोबडया , मत्स पालन , इत्यादी साठी .
७ ) विहीर कींवा बोअर घेने
८ ) ट्रक्टर , बैलगाडी , व इतर आवजरे
याची पण पडताळनी व्हायला पाहिजे ............
आसो मि हे सर्व काही शेतकर्या चा विरोधक म्हणुन नाही लिहले हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत
आमच्या कडे ५ एकर शेती होती ति कोनत्या कारना साठी विकली तर , माझ्या बहिनी चे व चुलत बहिनी चे लग्न , शेती विकुन माझे आई वडिल आता दुसर्या च्या शेतात शेतजुर म्हणुन जातात कींवा उसतोड मजुर म्हणुन साखर कारखान्यावर जातात .
खरोखरीच शेतकरी का आत्मह्त्या करतो , याची खरी कारने शोधली पाहिजेत कर्ज माफी कींवा अनुदाने हा त्या वर चा उपाय नव्हे आपय आहे ?
काही खरी माहिती ..
१ ) शेतकर्याच्या कोनत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही , त्यामुळे दलाल शेतकर्या कडुन शेतिमाल कमी भावाने विकत घेउन शहरा च्या ठीकाणी कित्तीतरी आधिक भावाने विकतात .
२ ) शेतमालाची बाजारपेठ शेतकर्या च्या हातात नाही तिथे मारवाडी कींवा ईतर लोक आसतात .
३ ) जसे भारतात कोनत्याही वस्तुची फिक्स कींमत आहे तर मग शेतीमालाचिच का नाही .
उदा : कांदे १० रुपये किलो आहेत तर संपुर्ण भारतात १० रुपये किलो ने विकली गेली पाहिजेत आज कसे होते शेतकर्या कडुन ३ रुपये किलो ने कांदे घेउन ति १५ रुपये कीलो ने विकली जातात महण्जे फायदा कोनाचा ?
मि पुण्यात राह्तो ज्या वेळेस मी गावाकडे जातो त्या वेळेस वांगी , कांदे , भेंडी , टॅमाटो , ईतर भाजिपाला खुप झालेतर , ५ रुपये कीलो मिळतो कधी कधी तर २ कींवा ३ रुपये कीलो ने मिळतो मग शहरा च्या ठीकानीच का १५ ते ५० रुपये कीलो ने मिळतो महण्जे फायदा कोनाचा ,
आशी खुप कारने आहेत पण एक मत्र खरे , शेतकर्याने कष्ट करुन शेतीत माल पिकवला तरी तो त्या शेतमालाची व त्याच्य कष्टाची किंमत टरवु शकत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल, ति कींमत सरकरी आधिकारी , दलाल कींवा तुम्ही आम्ही ठरवतो .
४) साखरकारखाने ही उसाचे राजकारण करतात , एक कारखाना उसाला १५०० रुपये भाव देतो तर दुसरा कारखाना उसाला ६०० कींवा ७०० रुपये भाव देतो , मग मला प्रश्न्न पडतो की १५०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर पांढरी आसते आणी ६०० कींवा ७०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर काळी आसते का ?
कधीकधी तर ही साखरकारखाने शेतकर्या चा उस शेतातच राहुन देतात कारन काय तर तो आमुक तमुक पार्टीचा माणुस आहे , गरीब शेतकर्यांचे तर हाल विचर्याला नको .
५ ) महाराष्ट्रातील साखरकारखाने , कॄषीउत्तपंन्न बाजार समीती , भु विकास बँक , जिल्हा सहकारी बँक ,
या संस्थाशी शेतकर्या जास्त सबंध येतो पण या संस्था कोनत्या कोनत्या राजकीय पुढारयाच्या ताब्यात आसतात , म बँक , कारखाना तोट्यात चालतो आहे आसे दाखवुन त्यावर सरकारी पॅकेज मीळवायचे , ते पॅकेज स्वता: कडेच ठेवायचे शेतकर्याचे काय तो त्याचा काही करेल
मुळात महाराष्ट्रातील कोणतीच सह्कारी संस्था तोट्यात चालत नसावी पण सह्कार खात्याला लागलेली भ्रष्टाचारी नेत्याची धुळ ....
दिंनाक : ८/०९/०९ रोजी , लोकमत या र्वतमान पत्रात शेतकर्यांच्या आत्मह्त्या संबधी आलेली माहीती देत आहे .
सहा वर्षात बीड जिल्हायातील ३८२ शेतकर्याच्या आत्मह्त्या .
बीड , दि. ७ बीड जिल्हात गेल्या सहा वर्षात ३८२ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यातील ११९ शेतकर्यांच्या आत्मह्त्या या कर्जबाजारीला कंटाळुन झाल्याचे सिध्द झाले आहे . १११ जणांच्या वारसांना शासनाची एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर आट जणांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु आहे .
जिल्हाधिकारी भारत सासने यांच्या उपस्थितीत सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या आत्मह्त्या संदर्भात बैटक झाली. यात उर्वरित प्रकरणांवर चर्चा झाली . कायमस्वरुपी दुष्काळी हे बिरुद चिटकलेल्या बीड जिल्हात शेतकर्यांच्या आत्मह्त्येचे लोण पसरले आहे गेल्या सहा वर्षात ३७८ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यात २००४ सली ११ जणांच्या आत्मह्त्या केल्या. त्या पैकी एक ही आत्मह्त्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे . तर २००६ या एकट्या वर्षात जिल्हात १२४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या झाल्या आहेत . या पैकी फक्त २३ आत्महत्या प्रशासकीय मदती साटी पात्र ठरल्या तर १०१ प्रकरणात कर्जबाजारीपणामुळे नसल्याचा शेरा प्रशासनाने मारला.
२००७ यावर्षात आत्मह्त्येचा सिलसिला कायम राहीला .याही वर्षी एकुण ९५ जणांनी आत्मह्त्या केल्या . पैकी ३९ प्रकरणात वारसांना शासकीय मदत मिळाली तर ५६ प्रकरणे नाकारण्यात आली . २००८ यावर्षी ८६ जणांनी आत्मह्त्या केल्या त्यातील ४४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या मदती साठीग्राह्य धरुन उरलल्या ४२ प्रकरणात आत्मह्त्याचे कारण कर्ज बाजारीपणा नसल्याचे नमुद केले . २००९ वर्षात ५४ जणांच्या आत्मह्त्या झाल्या . यातील १४ जणांच्या वारसांना मदत मिळाली तर ३२ प्रकणे आपात्र टरविण्यात आहेत ४ शेतकर्यांचे अहवाल अद्दाप नाहीत
२००९ या चालु वर्षात आत्मह्त्या केलेल्या ४ प्रकणांचा अहवाल अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही . या बाबत पोलिस आणि प्रशासन चोकशी करीत असुन अहवाल मिळाल्यानंतर ती प्रकरणे चर्चेसाटी येणार आहेत .
वरील माहीती जशासतशी मी दिली आहे ,
म्हण्जे सहा वर्षा कर्जबाजारीपणा मुळे फक्त ११९ शेतकर्यांने आत्मह्त्या केल्या बाकीच्या शेतकर्याची २६३ शेतकर्याची आत्मह्त्येची कारणे कोनती ? आणी ते कोनशोधनार ..
आसो माझी ही माहिती सर्व शेतकर्या चि आहे आसे नाही , काही शेतकरी आपल्या कष्टा ने आगदी खडक माळावर ही पीके घेतात . काही बीच्यारे शेती आसुन ही उपाशी राह्तात , काहीच्या शेतात तर काहीच पीकत फक्त नावाला शेती .
मायबोली वर पहीलाच प्रयत्न

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll