Welcome You All

RSS
Showing posts with label Fishery. Show all posts
Showing posts with label Fishery. Show all posts

पर्लस्पॉट माशाचे बीजोत्पादन

केरळमध्ये शेतीच्या बरोबरीने मत्स्यशेती हा पूरक उद्योग चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. त्यामुळे मत्स्यबीजांना देखील चांगली मागणी असते हे लक्षात घेऊन अथोली (जि. कोझिकोडे) येथील मनोज के. के. यांनी पर्लस्पॉट मत्स्यपालन आणि मत्स्यबीजोत्पादनातून चांगला रोजगार निर्माण केला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की पहिल्यांदा मी घराजवळील लहानशा शेततळ्यात टायगर कोळंबीच्या संवर्धनास सुरवात केली; परंतु "व्हाइट स्पॉट' रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोळंबीचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे मी नीमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकडे लक्ष केंद्रित केले. आमच्या तळ्यामध्ये पर्ल स्पॉट, मुलीट या जातीचे मासे चांगल्या प्रकारे वाढताना आढळले. या माशांना बाजारात चांगली मागणी असते. या मत्स्य संवर्धनासाठी पिरुवन्नामुझी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.

कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. बी. प्रदीप म्हणाले, की कोळंबी बीजोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लागते; परंतु श्री. मनोज यांच्याकडे असलेले शेततळे लक्षात घेऊन आम्ही कोळंबी बीजोत्पादनासाठी लहान टाक्‍या तयार केल्या. आमच्या सल्ल्यानुसार श्री. मनोज यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोळंबी बीजोत्पादनास सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी कोळंबीच्या 5000 नवजात पिल्लांची विक्री केली.

बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धत
कोळंबी बीजोत्पादनानंतर श्री. मनोज यांनी पर्लस्पॉट जातीच्या बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धतीचा अवलंब केला आहे. हा पिंजरा त्यांनी प्लॅस्टिकच्या जाळीपासून तयार केला आहे. शेततळ्यातील पाण्यात हा पिंजरा तरंगण्यासाठी त्यांना चारही बाजूने पीव्हीसी पाइपचा सांगाडा तयार केला. परंतु पिंजरा तयार करण्यासाठी पीव्हीसी पाइपचा खर्च वाढला. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. बूच लावलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जाळीच्या पिंजऱ्याला वरच्या बाजूला लावल्या. त्यामुळे हा जाळीचा पिंजरा पाण्यात योग्य पद्धतीने तरंगू लागला. जाळीचा हा पिंजरा 3 मीटर ु 1 मीटर ु 1 मीटर आकाराचा आहे. पी.व्ही.सी. पाइपचा वापर करून हा पिंजरा बनविण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु श्री. मनोज यांनी हा जाळीचा पिंजरा एक हजार रुपयांत तयार केला आहे. या पिंजऱ्याचा वापर करून दर हंगामात 20 हजार पर्लस्पॉट बोटुकलींची विक्री परिसरातील शेतकऱ्यांना केली. या कमी खर्चाच्या मत्स्यबीजोत्पादनातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सेझ आणि शेतकरी

ह्या देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर औद्योगिक कामकऱ्यांची गरज आहे. देशातील ६०% हून अधिक लोक शेतात काम करतात (आणि त्यातही ४०% लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळते!). हे सगळे हात देशाच्या आर्थिक समृद्धिला हातभार लावायला असमर्थ आहेत कारण रोजगार निर्माण करण्याच्या नावाखाली शेतजमिनीच्यामालकांना सरकार वाटेल त्या सवलती देते, पण ह्या सवलती घेउनही शेताचे उत्पादन वाढत नाही. अणि कसे वाढणार उत्पादन? देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षात दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही. शिवाय काम करणाऱ्यांपेक्षा काम मागणारे अधिक असल्यामुळे त्यांचे शोषण चालू आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त २% लोक शेतात काम करतात, आणि तरीही अमेरिकेचे धान्य उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे. ह्याचे कारण असे की जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जर शेती केली तर ती किफायती ठरत नाही. धान्याबरोबरच ह्या देशाला इतर साधनसामुग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडे नसल्यानेह्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर जर औद्योगिक कामाकडे वळवले तर देशाची परिस्थिती सुधारेल. औद्योगिक क्षेत्रात देशातले १२% लोक काम करतात आणि देशाचे जवळजवळ ३०% उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) काढतात. ह्याउलट, शेतकी व्यवसायात देशातले ६०% हून अधिक लोक काम करतात आणि केवळ १७% उत्पन्न काढतात. यावरून हे दिसून येईल की शेतावर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा, औद्योगिक मजुरांची उत्पादन क्षमता काही पटींनी अधिक आहे. सोपा हिशेब आहे: देशातल्या ४०% शेत कामकऱ्यांना जर औद्योगिक क्षेत्राकडे वळवले तर देशाचे उत्पन्न ३ पटींनी वाढेल. अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही, पण गेल्या ६० वर्षात नक्कीच करता आले असते. पण गांधीजींच्या भोंगळ कल्पनांमध्ये गुंतून देशाने आपले नुकसान करून घेतले आहे. शिवाय औद्योगिकीकरणामुळे शोषणही कमी होते, कारण औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग संघटीत आहे (लेबर युनियन्स), पण शेतमजुरांचे असे संघटन फार कमी प्रमाणावर बघायला मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मत्स्यसंवर्धन

मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान-मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जमिनीची निवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते.
जर सपाट जमिनीवर मत्स्यतळे बांधले, तर तळाच्या बुडामध्ये उतार देणे महत्त्वाचे असते. या उतारामध्ये पाणी बाहेर काढता येते. तळ्याचा विस्तार 0.1 हेक्‍टर ते एक हेक्‍टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते. सुरवातीला 0.1 हेक्‍टर जलक्षेत्र तयार करून मत्स्यपालन सुरू करावे.
संवर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील परिवर्तनास तोंड देऊन प्रमाणित वनस्पतिजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी माशांच्या जातींची निवड फायदेशीर ठरते. तसेच पाण्यातील विविध थरांत उपलब्ध नैसर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कार्प जातीच्या माशाची एकत्रित किंवा मिश्रशेती करता येते. भारतीय प्रमुख कार्प जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामधील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कार्प वाढविल्यास या अन्नावर उपजीविका करून भारतीय प्रमुख कार्पबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्‍य होते. या माशांना चांगली मागणी आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll