Welcome You All

RSS

The Story of Prahlada





Hiranyakashipu was the king of the Daityas. The Daityas, though born of the same parentage as the Devas or gods, were always, at war with the latter. The Daityas had no part in the oblations and offerings of mankind, or in the government of the world and its guidance. But sometimes they waxed strong and drove all the Devas from the heaven, and seized the throne of the gods and ruled for a time. Then the Devas prayed to Vishnu, the Omnipresent Lord of the universe, and He helped them out of their difficulty. The Daityas were driven out, and once more the gods reigned. Hiranyakashipu, king of the Daityas, in his turn, succeeded in conquering his cousins, the Devas, and seated himself on the throne of the heavens and ruled the three worlds — the middle world, inhabited by men and animals; the heavens, inhabited by gods and godlike beings; and the nether world, inhabited by the Daityas. Now, Hiranyakashipu declared himself to be the God of the whole universe and proclaimed that there was no other God but himself, and strictly enjoined that the Omnipotent Vishnu should have no worship offered to Him anywhere; and that all the worship should henceforth be given to himself only.

Hiranyakashipu had a son called Prahlâda. Now, it so happened, that this Prahlada from his infancy was devoted to God. He showed indications of this as a child; and the king of the Daityas, fearing that the evil he wanted to drive away from the world would crop up in his own family, made over his son to two teachers called Shanda and Amarka, who were very stern disciplinarians, with strict injunctions that Prahlada was never to hear even the name of Vishnu mentioned. The teachers took the prince to their home, and there he was put to study with the other children of his age. But the little Prahlada, instead of learning from his books, devoted all the time in   teaching the other boys how to worship Vishnu. When the teachers found it out, they were frightened, for the fear of the mighty king Hiranyakashipu was upon them, and they tried their best to dissuade the child from such teachings. But Prahlada could no more stop his teaching and worshipping Vishnu than he could stop breathing. To clear themselves, the teachers told the terrible fact to the king, that his son was not only worshipping Vishnu himself, but also spoiling all the other children by teaching them to worship Vishnu.

The monarch became very much enraged when he heard this and called the boy to his presence. He tried by gentle persuasions to dissuade Prahlada from the worship of Vishnu and taught him that he, the king, was the only God to worship. But it was to no purpose. The child declared, again and again, that the Omnipresent Vishnu, Lord of the universe, was the only Being to be worshipped — for even he, the king, held his throne only so long as it pleased Vishnu. The rage of the king knew no bounds, and he ordered the boy to be immediately killed. So the Daityas struck him with pointed weapons; but Prahlad's mind was so intent upon Vishnu that he felt no pain from them.
 
When his father, the king, saw that it was so, he became frightened but, roused to the worst passions of a Daitya, contrived various diabolical means to kill the boy. He ordered him to be trampled under foot by an elephant. The enraged elephant could not crush the body any more than he could have crushed a block of iron. So this measure also was to no purpose. Then the king ordered the boy to be thrown over a precipice, and this order too was duly carried out; but, as Vishnu resided in the heart of Prahlada, he came down upon the earth as gently as a flower drops upon the grass. Poison, fire, starvation, throwing into a well, enchantments, and other measures were then tried on the child one after another, but to no purpose. Nothing could hurt him in whose heart dwelt Vishnu.

At last, the king ordered the boy to be tied with mighty serpents called up from the nether worlds, and then cast to the bottom of the ocean, where huge mountains were to be piled high upon him, so that in course of time, if not immediately, he might die; and he ordered him to be left in this plight. Even though treated in this manner, the boy continued to pray to his beloved Vishnu: "Salutation to Thee, Lord of the universe. Thou beautiful Vishnu!" Thus thinking and meditating on Vishnu, he began to feel that Vishnu was near him, nay, that He was in his own soul, until he began to feel that he was Vishnu, and that he was everything and everywhere.

As soon as he realised this, all the snake bonds snapped asunder; the mountains were pulverised, the ocean upheaved, and he was gently lifted up above the waves, and safely carried to the shore. As Prahlada stood there, he forgot that he was a Daitya and had a mortal body: he felt he was the universe and all the powers of the universe emanated from him; there was nothing in nature that could injure him; he himself was the ruler of nature. Time passed thus, in one unbroken ecstasy of bliss, until gradually Prahlada began to remember that he had a body and that he was Prahlada. As soon as he became once more conscious of the body, he saw that God was within and without; and everything appeared to him as Vishnu.
 
When the king Hiranyakashipu found to his horror that all mortal means of getting rid of the boy who was perfectly devoted to his enemy, the God Vishnu, were powerless, he was at a loss to know what to do. The king had the boy again brought before him, and tried to persuade him once more to listen to his advice, through gentle means. But Prahlada made the same reply.   Thinking, however, that these childish whims of the boy would be rectified with age and further training, he put him again under the charge of the teachers, Shanda and Amarka, asking them to teach him the duties of the king. But those teachings did not appeal to Prahlada, and he spent his time in instructing his schoolmates in the path of devotion to the Lord Vishnu.
 
When his father came to hear about it, he again became furious with rage, and calling the boy to him, threatened to kill him, and abused Vishnu in the worst language. But Prahlada still insisted that Vishnu was the Lord of the universe, the Beginningless, the Endless, the Omnipotent and the Omnipresent, and as such, he alone was to be worshipped. The king roared with anger and said: "Thou evil one, if thy Vishnu is God omnipresent, why doth he not reside in that pillar yonder?" Prahlada humbly submitted that He did do so. "If so," cried the king, "let him defend thee; I will kill thee with this sword." Thus saying the king rushed at him with sword in hand, and dealt a terrible blow at the pillar. Instantly thundering voice was heard, and lo and behold, there issued forth from the pillar Vishnu in His awful Nrisimha form — half-lion, half-man! Panic-stricken, the Daityas ran away in all directions; but Hiranyakashipu fought with him long and desperately, till he was finally overpowered and killed.

Then the gods descended from heaven and offered hymns to Vishnu, and Prahlada also fell at His feet and broke forth into exquisite hymns of praise and devotion. And he heard the Voice of God saying, "Ask, Prahlada ask for anything thou desires"; thou art My favourite child; therefore ask for anything thou mayest wish." And Prahlada choked with feelings replied, "Lord, I have seen Thee. What else can I want? Do thou not tempt me with earthly or heavenly boons." Again the Voice said: "Yet ask something, my son." And then Prahlada replied, "That intense love, O Lord, which the ignorant bear to worldly things, may I have the same love for Thee; may I have the same intensity of love for Thee, but only for love's sake!"

Then the Lord said, "Prahlada, though My intense devotees never desire for anything, here or hereafter, yet by My command, do thou enjoy the blessings of this world to the end of the present cycle, and perform works of religious merit, with thy heart fixed on Me. And thus in time, after the dissolution of thy body, thou shalt attain Me." Thus blessing Prahlada, the Lord Vishnu disappeared. Then the gods headed by Brahma installed Prahlada on the throne of the Daityas and returned to their respective spheres.


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आवळा

आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. लागवडीसाठी कृष्णा, कांचन, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी. लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. 
चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले कलम निवडावे. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये चांगली माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करवी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

जल-मृद्‌संधारणासाठी गवताची लागवड

1) कुश गवत ः हे गवत एक मीटरपर्यंत वाढते. हे बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असताच. त्यापासून अनेक शाखा येतात आणि आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात. 
2) मुंज ः हे गवत पाच मीटरपर्यंत वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटापासून केली जाते. या गवताची उंची 15 ते 90 सें.मी. पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते. 
3) वाळा (खस) ः यास "व्हेटीव्हर' असेही म्हणतात. या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. 
4) कुंदा ः हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. बहुवर्षायू या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते. 
5) पवना ः सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणारे या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते. 
6) शेंडा ः हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे, मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते. 
7) मोशी ः डोंगर उतारावर 15 ते 50 सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे.
नद्या, नाले, ओहोळ, रस्ते खचणे, ढासळणे इ.साठी बांबू फायदेशीर आहे. नदी, नाल्याच्या कडेने कळक, मानवेल, चिवारी, मेस, कोंड्यामेस, मेसकाठी, पिवळा बांबूची लागवड करावी. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ऊस

ऊस पिकासाठी मध्यम ते भारी प्रकारची, चांगल्या निचऱ्याची, क्षारांचे प्रमाण कमी असणारी, पीक पोषक घटकांची उपलब्धता योग्य प्रमाणात असणारी जमीन निवडावी. गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येतो. या रासायनिक गुणधर्माचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होत असतो. म्हणून शिफारस केलेल्या ऊस जातीची निवड करावी. 
1) लवकर पक्व होणाऱ्या जाती ः कोसी 671, को 8014 , को 7219 , को 92005 
2) मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती ः कोएम 7125, को 86032 , को 7527, को 94012 
उत्तम गूळ तयार करण्यासाठी ऊस पिकास सेंद्रिय, रासायनिक व जैविक अशा एकात्मिक अन्नद्रव्ययुक्त संतुलित खतांचा पिकाच्या अवस्थेनुसार वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पोषक अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि उसाची वाढ चांगली होते, त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होतो. याकरिता सुरू उसासाठी हेक्‍टरी 20 टन, पूर्वहंगामी उसासाठी 25 टन आणि आडसालीसाठी 30 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे. शेणखताचा अभाव असल्यास पाचटाचे कंपोस्ट किंवा गांडूळ खत प्रति हेक्‍टरी पाच टन वापरावे किंवा हिरवळीच्या पिकांपैकी धैंचा किंवा ताग घेऊन 45 दिवसांचे झाल्यावर जमिनीत गाडावे आणि नंतर उसाची लागण करावी. ऊसपिकास शिफारशीप्रमाणे भरणीपर्यंत सर्व रासायनिक खतांची मात्रा द्यावी. सुरू उसास 200 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश, पूर्वहंगामी उसासाठी 272 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश, आडसाली उसासाठी 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश ही मात्रा द्यावी. रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये माती परीक्षणानुसार द्यावीत. शिफारशीपेक्षा जास्त व उशिरा नत्रयुक्त दिल्यास रसातील नत्र व ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे गुळाची प्रत खराब होऊन उताराही घटतो. गुळाच्या टिकाऊपणावरही अनिष्ट परिणाम होतो, तसेच नत्र खताची मात्रा लागणीच्या वेळी दहा टक्के, लागणीनंतर 45 दिवसांनी 40 टक्के, 60 दिवसांनी दहा टक्के व उरलेली 40 टक्के 135 दिवसांनी द्यावी. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खते योग्य प्रमाणात दोन हप्त्यात लागणीचे वेळी व 135 दिवसांनी दिल्यास रसाची प्रत सुधारते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ऊस पिकास आवश्‍यकतेनुसार ऊस वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी व पावसाळ्यात गरजेप्रमाणे पाणी द्यावे. ऊस तोडणीपूर्वी कमीत 15 दिवस अगोदर उसाला पाणी देऊ नये. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

केळी पिकासाठी द्यावयाच्या रासायनिक खतांविषयी मार्गदर्शन

पीक उत्पादनवाढीसाठी कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्‍यक आहे. नत्रासाठी युरिया, स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेट, पालाशसाठी म्युरेट ऑफ पोटॅश या एकेरी खतांचाच शिफारशीप्रमाणे वापर करावा. सिंगल सुपर फॉस्फेटमधून गंधक व कॅल्शिअम या अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असल्याने, गंधक, कॅल्शिअम या दुय्यम अन्नद्रव्यांसाठी वेगळी खते टाकण्याची गरज नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोहासाठी फेरस सल्फेट, जस्तासाठी झिंक सल्फेट, मॅंगेनिजसाठी मॅंगेनिज सल्फेट, तांब्यासाठी कॉपर सल्फेट आणि बोरॉनसाठी बोरॅक्‍स या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा माती परीक्षणानुसार जमिनीतून किंवा फवारणीद्वारे वापर करावा; तसेच रासायनिक खतांबरोबरच उपलब्धतेनुसार शेणखत / कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची पिके इ. सेंद्रिय स्रोतांचाही आवर्जून उपयोग करावा. 

खत मात्रा ः 
सेंद्रिय खते - शेणखत दहा किलो प्रति झाड किंवा गांडूळ खत पाच किलो प्रति झाड जैविक - ऍझोस्पिरीलम - 25 ग्रॅम प्रति झाड व पीएसबी - 25 ग्रॅम प्रति झाड लागवडीच्या वेळी द्यावे. केळीच्या प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा ..............कोली घेऊन खते द्यावीत. 

रासायनिक खते ग्रॅम प्रति झाड 
खत मात्रा देण्याची वेळ-------------युरिया-----------सिंगल सुपर फॉस्फेट-----म्युरेट ऑफ पोटॅश 
लागवडीनंतर 30 दिवसांच्या आत---82--------------250-------------------83 
लागवडीनंतर 75 दिवसांनी---------82-------------- -- ------------------- --- 
लागवडीनंतर 120 दिवसांनी--------82-------------- --- ------------------- --- 
लागवडीनंतर 165 दिवसांनी--------82-------------- -- -------------------- 83 
लागवडीनंतर 210 दिवसांनी--------36-------------- -- -------------------- --- 
लागवडीनंतर 255 दिवसांनी--------36-------------- ---------------------- 83 
लागवडीनंतर 300 दिवसांनी--------36 ------------- --- -------------------83 
एकूण --------------------------435--------------250------------------332 
टीप ः तक्‍त्यातील खतमात्रेत माती परीक्षणानुसार योग्य ते बदल करावेत. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ऊस उत्पादन - महत्त्वाकांक्षी प्रयोग



"एकरी शंभर टन ऊस उत्पादन घ्या' हा नारा अलीकडे अनेक वेळा दिला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून (जि. कोल्हापूर) केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर गाव आहे. 

तेथील मलकारी तेरदाळे यांनी मात्र हा "नारा' आपल्या शेतीत एकदा नव्हे तर सातत्याने अमलात आणला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित 2010-11 हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला आहे.

पाणी, खत, बेणे यांच्या वापरात बचत व त्यांचा काटेकोर वापर करणे सध्याच्या ऊसशेतीत गरजेचे झाले आहे. अनेक शेतकरी आपले नियोजन त्याप्रमाणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर (ता. चिक्कोडी) हे गाव आहे. सरकारी कामकाज बेळगावला होत असले तरी या गावचा दररोजचा संपर्क महाराष्ट्रातील शहरांशीच येतो. याच गावातील मलकारी नेमू तेरदाळे या शेतकऱ्याने गेल्या काही वर्षांपासून उसाचे एकरी उत्पादन सातत्याने शंभर टनांपर्यंत तर काही वेळा त्याहून जास्त घेण्याचा सपाटा लावला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या 2010-11 या हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला. खोडव्याची तोडणी झाल्यानंतर सातत्याने रान वाळविण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. यामुळेच उत्पादनात सातत्य तर राहतेच, पण जमिनीचा पोत कायम राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

लावणीपूर्वीचे व्यवस्थापन 
तेरदाळे यांची चोवीस एकर जमीन आहे. त्यात ते सातत्याने ऊस घेतात. प्रत्येक वर्षी या पिकाचे त्यांचे नियोजन वेळापत्रक ठरलेले असते. ऊस स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीही फुले 265 जातीचा ऊस त्यांनी घेतला होता. याचे उत्पादन शंभर टनांवर निघाले. तेरदाळे यांचे लागवडीचे नियोजन थोडक्‍यात व प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचे तर हरभऱ्याचा बेवड चांगला असल्याने या पिकानंतर ऊस घेण्याचे नियोजन केले. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हरभऱ्याचे उत्पादन कमी आले. एकरी चार पोती हरभरा निघाला. हरभऱ्याच्या काढणीनंतर उभी- आडवी नांगरट केली. यानंतर एक महिना कालावधीपर्यंत रान वाळविले. यानंतर पुन्हा नांगरट केली. त्यानंतर दक्षिणोत्तर सऱ्या सोडल्या. त्याही महिनाभर वाळविल्या. लागवडीपूर्वी माती परीक्षण केले होते. त्याच्या अहवालानुसार जमिनीस एकरी चार पोती सेंद्रिय खताचा डोस दिला. 

लावणीनंतरचे व्यवस्थापन 
मागील वर्षी 27 जुलैला को- 86032 या जातीची सरी पद्धतीने आडसाली लावण केली. दोन डोळ्यांचे एकरी साडेसहा हजार टिपरी इतके बेणे वापरले. साडेतीन फुटाची सरी सोडून चांगल्या वाफशावर लागवड केली. या वेळी हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर भरणीपूर्वी तीन भांगलणी केल्या. पहिली भांगलण लावणीनंतर एक महिन्यांनी केली. त्यानंतर पंधरा दिवसांत युरियाची दोन पोती, निंबोळी पेंड एक पोती मिसळून ते देण्यात आले. भरणीनंतर दोन भांगलणी झाल्या. सर्व भांगलणी मजुरांमार्फतच केल्या. तणनाशकाचा कोठेही उपयोग केला नाही. भरणीपूर्वी तीन व भरणीनंतर दोन अशा प्रकारे पाच वेळा टॉनिक दिले. एकरी पन्नास हजार ऊस संख्या कशी राहील याकडे विशेष करून लक्ष दिले. निरोगी नसलेले फुटवे काढले. चांगल्या बियाणे प्लॉटमधून बेण्याची निवड केल्याने उगवण चांगली म्हणजे सरासरी 90 ते 95 टक्‍क्‍यापर्यंत झाली. भरणीच्या वेळी युरिया तीन पोती, पोटॅश तीन पोती, गंधक दहा किलो, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत दहा किलो आदींचा वापर केला. लोकरी मावा येऊ नये यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी करण्यात आली. 
पाणी नियोजन सरी पद्धतीनेच पाणी दिले. लावणीपासून तोडणीपर्यंत 51 वेळा पाणी दिले. पाणी देताना पाणी अतिरिक्त अथवा कमी होणार नाही याची खबरदारी घेतली. मरके फुटवे काढण्यासाठी उगवणीपासून भरणीपर्यंत "अर्धी' सरीच पाणी दिले. भरणीनंतर पाण्याच्या प्रमाणात थोडी वाढ केली. पावसाळा व हिवाळ्याच्या कालावधीत वेळेत तीन आठवडे ते एक महिन्यानंतर पाणी दिले. तर उन्हाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी दिले. पाणी देताना नेहमीच काटेकोरपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. तोडणी होईपर्यंत काटकसरीने व वाफसा स्थिती राहील अशा बेतानेच पाणी दिले. 


जमा खर्च (एकरी) 
तपशील खर्च (रुपयांत व एकरी) 

ट्रॅक्‍टर भाडे - 3000 
ऊस बियाणे- 3600 
खत- 10,000 
मजुरी खर्च- 4000 (मशागत) 
मजुरी खर्च 2500 (पाणी देण्यासाठी) 
बैलजोडी- 2000 
रसायने- 4000 
.............................................. 
एकूण खर्च- 29 100 

मिळालेले उत्पादन- 117.795 मेट्रिक टन 

मिळालेला भाव- 2300 रुपये प्रति मेट्रिक टन 

एकूण रक्कम- दोन लाख 70 हजार 928 रुपये 

खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा - दोन लाख 41 हजार 828 रुपये 

शतकवीर "तेरदाळे' 
तेरदाळे यांनी यापूर्वीही सातत्याने एकरी शंभर टनांच्या वर ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांचे सरासरी उत्पादन 70 टन इतके आहे. गेल्या दहा वर्षांत सत्तर टनांपेक्षा कमी ऊस त्यांनी काढलेला नाही. त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची विविध पारितोषिकेही पटकाविली आहेत. तेरदाळे सध्या तरी फुले 265 व को 86032 या वाणाचा वापर करतात. यापूर्वीही त्यांनी अनेक वाण वापरले, मात्र हे दोन वाण अधिक फायदेशीर वाटल्याचे त्यांनी सांगितले. शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या वतीने एकरी दीडशे टन ऊस उत्पादन हा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्यात तेरदाळे यांनी भाग घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सा. रे. पाटील यांच्या सान्निध्यात राहिल्याने अनेक लहान-सहान गोष्टींचा अभ्यास करता आला. कारखान्याच्या वतीने प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. तेरदाळे स्वत: या कारखान्याचे संचालक असल्याने या सत्काराच्या वेळी ते उपस्थित असायचे. दुसऱ्याला हे पारितोषिक मिळते तर आपल्याला का मिळू नये, असा विचार येऊन त्यांनी आपली शेती या कारखान्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून सुधारली. या चांगल्या शेतीत आजपर्यंत सातत्य ठेवले आहे. 

रान वाळविण्यामुळे उत्पादनात वाढ 
उच्चांकी उत्पादनाबाबत बोलताना तेरदाळे यांनी सांगितले, की साखर कारखान्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी उसाचे व्यवस्थापन केले; परंतु माझ्या शेतीच्या यशात अनेक गोष्टींपैकी शेताला देत असलेली विश्रांती ही गोष्टही महत्त्वाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उसाची लागवड करण्याआधी सुमारे दोन महिन्यांपर्यंत शेतजमिनी पूर्ण उन्हात वाळवितो. जमिनीचा पोत तयार होण्यासाठी जमिनीला मिळालेली विश्रांती महत्त्वाची ठरते. सूर्यप्रकाशामुळे जमिनीची प्रत सुधारून ती अधिक उत्पादनशील बनते असा माझा अनुभव आहे. साधारणत: 1994 पासून मी सातत्याने जमीन तापविण्यावर भर दिला आहे. तसेच ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांसोबत हरभऱ्याचे पीक घेतो. ही पिके काढल्यानंतर रान वाळवितो. इतर मशागतींबरोबरच रान वाळविणे म्हणजेच उत्पादन वाढविणे हे यशाचे सूत्र मी अंगीकारले आहे. खते देताना ती विस्कटून न टाकता खते टाकल्यानंतर ती झाकून घेतो. यामुळे पाण्याबरोबर खते वाहून जात नाहीत, तसेच पाणी देताना रानातले पाणी बाहेर पडू नये यावर विशेष लक्ष असते. सरीतून पाणी कडेला जाण्याअगोदर काही वेळ सरीचे पाणी बंद केले जाते. यामुळे सरीत पाणी अतिरिक्त होत नाही. जमिनीला हवे तेवढे पाणी मिळते. अशा लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिल्यानेच माझ्या उत्पादनातील सातत्य टिकून आहे. 

शेतकरी संपर्क 
मलकारी नेमू तेरदाळे, 0230-2600225 
मु.पो. माणकापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पॉवर टिलर

पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करण्याचे काम करता येते. एकाच वेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात. फळबागांमध्ये आंतरमशागत करते वेळी दहा ते 15 सें.मी. खोलीपर्यंतचे तण समूळ काढले जाते. फळझाडाभोवती रोटाव्हेटरला पॉवर टिलर उलट्या दिशेने चालवून आळे तयार करता येतात. भातशेतीमध्ये रोटाव्हेटरच्या साह्याने चिखलणीचे काम सुलभरीत्या करता येते. बहुपीक टोकण यंत्राचा वापर करून भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, तूर, हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकांची टोकण करता येते.

झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे यंत्र पॉवर टिलरच्या पुढील बाजूस जोडता येते. या यंत्राद्वारे 30 सें.मी. व्यासाचे व 45 सें.मी. खोलीचे खड्डे खोदता येतात. गहू आणि भात कापणीसाठी, तसेच फळबागांमध्ये कीडनाशकांच्या फवारणी,धुरळणीसाठीही पॉवर टिलरचा वापर केला जातो. ट्रॅक्‍टरप्रमाणे पॉवर टिलरला ट्रॉली जोडून शेतीमालाची वाहतूक करता येते. पॉवर टिलरच्या मागील बाजूस जोडून भात मळणी यंत्र वापरता येते. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कापसाला भाव

यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव असला, तरी सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही. कारण मोठी भाववाढ होण्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला होता. सध्या कापसाची आवक बंद झाल्यासारखी आहे. चालू हंगामात शाळू ज्वारीची आवक कमी होत असून, भाव गेल्या हंगामाच्या तुलनेत वाढलेले आहेत..
हंगाम संपताना जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढय़ात कापसाचे भाव मोठय़ा प्रमाणावर कमी झाले. या वर्षीच्या हंगामात नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक सुरू झाली आणि भावासोबत आवकही चढत्या कमानीने राहिली. सर्वाधिक सहा हजार ७३१ रुपये क्विंटल भावाची नोंद ११ फेब्रुवारीला झाली. हंगामात सर्वसाधारण सरासरी भाव पाच हजार रुपये क्विंटल राहिला. शेजारच्या देशांतील कापसाचे कमी उत्पादन आणि केंद्र सरकारने निर्यातीसाठी खुला केलेला कोटा याचा परिणाम कापसाचे भाव वाढण्यात जसा देशभर झाला, तसा जालना बाजारपेठेतही झाला. आता आवक संपण्याच्या काळात कापसाचा भाव तीन हजार रुपयांपर्यंत खाली आला. निर्यातीचा नवीन कोटा नसल्याचा परिणाम भाव कमी होण्यात झाल्याचे सांगण्यात येते.
यंदाचे वर्ष कापसाची अधिक आवक असणारे राहिले. या काळात जालना मोंढय़ात पाच लाख १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. त्याची एकूण किंमत दोन अब्ज २७ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. आधीच्या म्हणजे २००९-१० वर्षांत जालना मोंढय़ातील कापसाची एकूण आवक तीन लाख ९६ हजार क्विंटल आणि त्याची किंमत एक अब्ज २२ कोटी रुपये होती. यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव असला, तरी सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही. कारण मोठी भाववाढ होण्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला होता. सध्या कापसाची आवक बंद झाल्यासारखी आहे. एप्रिलमध्ये कापसाची एक हजार ८५० क्विंटल एवढीच आवक झाली.
चालू हंगामात शाळू ज्वारीची आवक कमी होत असून, भाव गेल्या हंगामाच्या तुलनेत वाढलेले आहेत. ज्वारीचा भाव एप्रिलमध्ये तीन हजार ६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. ३० एप्रिलला ज्वारीचा कमाल भाव तीन हजार २०० रुपये व किमान भाव एक हजार ७०० रुपये क्विंटल होता. गेल्या आर्थिक वर्षांत एक लाख ८८ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती; परंतु चालू आर्थिक वर्षांत मात्र ती लक्षणीय कमी होणार आहे. दररोजच्या जेवणात गव्हाऐवजी शाळू ज्वारीचा वापर करणाऱ्यांची संख्या जालना जिल्ह्य़ासह मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण करणारी ही भाववाढ आहे. गेल्या एप्रिलमध्ये जालन्याच्या मोंढय़ात १२ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती.नवीन गव्हाची आवक आधीच्या वर्षांपेक्षा जास्त होत आहे. गेल्या एप्रिलमध्ये गव्हाची आवक जवळपास २२ हजार क्विंटल होऊन कमाल भाव एक हजार ७०० रुपये व किमान भाव एक हजार १०० रुपये राहिला होता. सोयाबीनची वाढलेली आवक हेही नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांचे वैशिष्टय़. सन २००९-१०मध्ये सोयाबीनची आवक एक लाख २४ हजार क्विंटल होती आणि पुढील आर्थिक वर्षांत ती तीन लाख ५२ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत सोयाबीनच्या उलाढालीची एकूण किंमत आधीच्या आर्थिक वर्षांतील २७ कोटी रुपयांवरून ६९ कोटी रुपयांवर पोहोचली. ही उलाढाल भाववाढीमुळे नव्हे तर उत्पादनवाढीमुळे झाली. कारण या दोन्ही आर्थिक वर्षांतील सोयाबीनच्या भावात फारसा फरक नव्हता. जालन्याच्या मोंढय़ात सध्या मक्याचीही लक्षणीय आवक सुरू आहे. एप्रिलमध्ये ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याची आवक झाली आणि किमान भाव एक हजार २१० रुपये क्विंटल राहिला. सध्या जालना मोंढय़ात सर्वाधिक आवक होणारे मका हेच पीक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत पाच लाख ५४ हजार क्विंटल मक्याची आवक झाली होती. नवीन हंगाम कापूस, सोयाबीन, मक्याची वाढती आवक असणारा आणि कापसाचा त्याच प्रमाणे ज्वारीचा भाव अगोदरच्या हंगामापेक्षा अधिक भाव असणारा आहे. प्रामुख्याने कापूस-ज्वारीच्या भावासंदर्भात जालना मोंढय़ातील अनेकांचे अंदाज चुकविणारा हा हंगाम आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

एकाधिकार कापूस खरेदी योजना

कापुस उत्पादनाबाबत काही वैशिष्टये

१) महाराष्ट्र्र हे भारतातील कापुस उत्पादक राज्यापैकी एक प्रमुख राज्य आहे.
२) जगाच्या तुलनात्मकदृष्टया भारतात कापूस लागवडीखालील क्षेत्र भारताच्या तुलनात्मकदृष्टया ३० टक्के आहे.
३) जगाच्या तुलनात्मकदृष्टया भारतातील कापूस उत्पादन १५ टक्के आहे. तर महाराष्ट्र्रातील कापूस उत्पादकता भारताच्या सरासरी कापूस उत्पादकतेच्या ५० टक्के एवढी आहे.
४) जगाच्या तुलनात्मदृष्टया भारतातील कापूस उत्पादकता प्र. हे. ५० टक्के आहे मात्र महाराष्ट्र्रातील कापूस उत्पादकता भारताच्या सरासरी कापूस उत्पादकतेच्या ५० टक्के एवढी आहे.
१) महाराष्ट्र्र शासनाने ऑगस्ट १९७२ पासून राज्यामध्ये एकाधिकार कापूस खरेदी योजना कार्यान्वित केली. केंद्र शासनाच्या मान्यतेने वेळोवेळी योजनेस मुदतवाढ देण्यात आली.
२) २००१ पासून पुढील पाच वर्षासाठी या योजनेस मुदत वाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ हा शासनाचा प्रमुख अभिकर्ता म्हणून योजनेचे काम करीत आहे.

योजनेची ठळक वैशिष्टे :

१) राज्यातील कापूस उत्पादकांना रास्त व किफायतशीर भाव मिळवून देणे.
२) कापूस दलालांना दुर करुन किफायतशीर भावाचा पूर्ण फायदा कापूस उत्पादकांना मिळवून देणे.
३) कापूस उत्पांदकाना स्थिर उत्पन्न प्राप्त करुन देणे व त्यायोगे राज्यातील कापूस उत्पादनात वाढ करुन स्थैर्य निर्माण करणे.
४) ग्राहक गिरण्यांना (च्ेन्स्ुम्एर म्ल्ल्स्)ि शास्त्रशुध्द रीतीने प्रतवारी केलेला कापूस पुरविणे.
५) कापूस खरेदी, प्रक्रिया व विक्री या कामी सहाकारी संस्थांना पुर्णपणे गूतवून एकंदर सहकारी संस्थांना बळकटी आणणे.
६) विक्री व सहकारी कर्ज वसुली यामध्ये परिणामकारकरित्या सांगड घालणे.
७) कापसाच्या वेगवेगळया प्रक्रिया म्हणजे जिनिग व प्रेसिग, सरकीचे गाळण, सूत कताई व विणाई इ. ची सांगड घालुन ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे. जेणेकरुन वाढीव उत्पादनाचा लाभ गिरणी कामगार व कापूस उत्पादक या दोघांनाही मिळू शकेल.

हंगाम १९७२-७३ ते २००२-०३ काळातील योजना

१) एकुण कापूस खरेदी २४२२.६२ लाख किंटल/बांधलेल्या गाठी ४९५.०७ लाख.
२) कापूस उत्पादकाना अदा केलेले सुमारे रुपये २८२७३ कोटी.
३) कापूस उत्पादकांची संख्या ३५ लाख.
४) एकुण सहकारी कर्ज वसुली रुपये २३३५ कोटी.

रोजगाराच्या संधी उपलब्ध

१) कापूस पणन महासंघात कायम स्वरुपी २००० सेवक.
२) योजनेकरीता हगामी सेवक पहारेकरी ५०००,
३) योजनेकरीता मजुर, हमाल, इत्यादी ४००००,
४) या शिवाय खरेदी विक्री संघ, जिल्हा सहकारी बॅका, सहकारी जिनिंग प्रेसिग संस्था यामधील कायम स्वरुपी हंगामी
स्वरुपाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
शासनाने आतापर्यतच्या झालेल्या रु ३६६५ तूटी पोटी आजतागायत रु.१७२४ कोटी योजनेस उपलब्ध करुन दिलेले आहेत. मुक्त बाजारपेठेत एकाधिकार कापूस खरेदी योजना राबविणे हे अत्यंत जिकरीचे आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रथमच या योजनेत बदल करून हंगाम २००२-०३ मध्ये खाजगी जिनिंग प्रेसिंग संस्था सहकारी सूत गिरण्या, सी. सी .आय. इत्यादीचा शासनासोबतच चढाओढीने कापूस खरेदीची परवानगी दिली. राज्य शासनाने हंगाम २००२-०३ अंतर्गत लांब धाग्याच्या कापसाचे भाव रु २३०० व हंगाम २००३-०४ करीता रु. २५००/- प्रती किंव्टल जाहिर केले. पर्यायाने राज्यातील ३५ लाख कापूस उत्पादकांना या मुक्त बाजारपेठेचा फायदा मिळून त्यांना त्यांचा कापूस विकण्यासाठी पर्याय उपलब्ध होऊन कास्तकांरामध्ये संतोष निर्माण झाला. या बदलाचा फायदा राज्य शासनास होऊन ७५ कोटीचा हमी किंमतीवर निव्वळ नफा झाला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विदर्भातला शेतकरी कापसावर अवलंबून आहे

गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भातला शेतकरी कापसावर अवलंबून आहे. कापसानंतर इथल्या शेतकऱ्यांना आधार आहे तो सोयाबीनचा. पण कोरडवाहू कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता ही हक्काची पिकं तोट्याची पिकं ठरत आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही.
कापूस

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे तुषार टापरे गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाची लागवड करतात. कापूस हाच त्यांच्या जगण्याचा आधार. त्यांच्या परिसरातला कापूस लाँग स्टेपलचा असल्याने या कापसाची निर्यातही केली जाते. पण यंदा त्यांची परिस्थिती बिकट आहे. दरवर्षी एकरी सहा क्विंटल कापसाचं उत्पादन ते घ्यायचे, पण यंदा त्यांना एकरी तीन क्विंटलही उत्पादन मिळण्याची आशा नाही. सध्याच्या चार हजार रुपये क्विंटल दरानुसार त्यांना यातून १२ हजार रुपये मिळणार आहे. आता एक एकर कापसाच्या शेतीसाठी त्यांनी केलेला खर्च पाहूया....

पूर्वमशागत - १३०० रु.
बियाणं     - १५०० रु.
लागवड    - १५०० रु.
खत        - ३००० रु.
फवारणी    - २००० रु.
वेचणी      - २००० रु.

अशाप्रकारे तुषार टापरे यांना एकरी ११ हजार ३०० रुपये खर्च आला आणि सध्याच्या दरानुसार कापसातून त्यांना मिळतायत १२ हजार रुपये. सध्याच्या दरात कापसाची शेती परवडत नाही, त्यामुळे कापसाला किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याचं तोट्याचं गणित आपण पाहिलं. विदर्भातलं दुसरं हक्काचं पीक म्हणजे सोयाबीन, यंदा
सोयाबीन
सोयाबीनचीही  परिस्थिती वेगळी नाही. सोयाबीनचा एकरी उत्पादन खर्च साधारण नऊ हजारांच्या आसपास आहे आणि यंदा सोयाबीनची सरासरी एकरी उत्पादकता आहे पाच ते सहा क्विंटल. सध्या सोयाबीनला १८०० ते २,००० रुपये  क्विंटल दर मिळतोय. यानुसार सोयाबीनचं एकरी उत्पन्न मिळते ते फक्त १० हजारांच्या आसपास. एकरी खर्च नऊ हजार आणि उत्पादन फक्त १० हजार. त्यामुळे सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित तीन हजार रुपये क्विंटल दर मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत.

तोट्याच्या कोरडवाहू कापसामुळे यंदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विदर्भात कोरडवाहू शेतकऱ्यांचं प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर ओलीताच्या शेतीत कापसाची चार बोंड जास्त लागतील अशी आशा होती. पण सततच्या लोडशेडिंगमुळे त्या आशाही मावळत आहेत. आधीच कापसाचं उत्पादन कमी त्यात शासकीय खरेदी सुरु न झाल्यामुळे व्यापाऱ्यांची मनमानी खरेदी सुरुच आहे. 

विदर्भातली दोन हक्काची पिकं कापूस आणि सोयाबीनमधून यंदा उत्पादन खर्चही भरुन निघण्याची स्थिती नाही, मग पुढच्या हंमागात शेतीत पेरायचं काय आणि जगायचं कसं असा गंभीर प्रश्न या कोरडवाहू शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित कापूस आणि सोयाबीनला दर मिळावा अशी एकमुखी मागणी शेतकरी करत आहेत. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

भारत जागतिक कापूस बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे

भारत जागतिक कापूस बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना आधीच्या ऑर्डर पूर्ण करण्यास मुदत मिळेल की नाही, असा प्रश्ान् सध्या निर्माण झाला आहे. 

कापूस निर्यातीसाठी पाठविण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर निश्चित करण्यात आली असून तत्संबंधीची शिपिंग डॉक्युमेन्ट्स वस्त्रोद्योग मंत्रालयास सादर करण्यास तीन आठवड्यांचा अवधी मिळणार आहे. म्हणजे ५ जानेवारीपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. 

कारण यावषीर् कापसाचे नेमके किती पीक हाती येणार, याबाबत अद्याप निश्चित काही सांगता येत नाही. परंतु गतवर्षाच्या तुलनेने नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांतील कापसाची आवक नक्कीच कमी असणार, असा ठाम अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कापसाच्या रोज दोन लाख गासड्या बाजारात येणार असा अंदाज असताना केवळ ६० हजार गासड्याच प्रत्यक्षात बाजारात आणल्या जातील, अशी परिस्थिती आहे. 

गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील कापसाचे पीक लांबलेल्या पावसामुळे खराब झाले. शिवाय हवेतील अती आर्दता, पिवळेपणा आणि कीटकांचा प्रार्दुभाव या सर्वांचा फटका पिकाला बसला. ३ कोटी २० लाख ते ३ कोटी ५० लाख गासड्या पीक येईल, असा आधी व्यक्त करण्यात आलेला अंदाज सध्यातरी चुकीचा ठरलेला आहे. ३ कोटी गासड्या पीक हाती येईल, असा अंदाज आहे. 

या पार्श्वभूमीवर कॉटन अॅडव्हायझरी बोर्डाची पुन्हा एकदा बैठक बोलावून कापसाचा पुरवठा आणि मागणी यांचा आढावा घेणे अगत्याचे बनले आहे, त्याद्वारे अतिरिक्त कापसाचा अंदाज घेता येईल. 

या हंगामात अतिरिक्त कापूस असल्याचे आढळल्यास वस्त्रोद्योग मंत्रालयास निर्यातीसाठी पुन्हा मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या केवळ ५५ लाख गासड्या कापूस निर्यातीची परवानगी आहे. त्यानंतर पुन्हा कापूस परदेशात पाठवायचा की नाही, याबाबत इतर संबंधित खात्यांचीही मंजुरी घ्यावी लागणार आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जानेवारी उजाडेल, असे सांगण्यात आले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Downloadsofindia


Download Forms India – Download EPFO, Passport, Income Tax and other Government forms for Free
Download Forms India(©) welcomes you.
There is a huge list of government forms available and more regularly being added. Find those special forms which are present nowhere! For example find around 100 question FAQ for Passport, and All India comprehensive EPFO office address cum officers directory(90 pages), found nowhere else.
Download Forms India(©) welcomes your suggestions and feedback to increase and improve the repository of forms here. If you’ve any forms which you want to share with the general public then submit them here.
This entry was posted in Documents and Reports. Bookmark the permalink.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कृषी व तंत्रज्ञान

युगांडा देशातील डेनिस ओचिनो येथील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक जोमो केनयट्टा यांनी केळी पिकात वाढणाऱ्या एका बुरशीवर संशोधन केले आहे. अर्थात, ही बुरशी त्या पिकाला हानिकारक नाही, उलट केळी पिकांची प्रतिकारक्षमता वाढत असून, केळीतील सूत्रकृमींच्या प्रादुर्भावास अटकाव करणे शक्‍य होत असल्याचे आढळले आहे.
इंडोफाईट बुरशी सर्व वनस्पतींमध्ये आढळतातच, त्यांचा त्या पिकाला संसर्गही होतो; मात्र तशी ठळक लक्षणे पिकावर दिसून येत नाहीत. युगांडा व केनियामध्ये याच बुरशींवर अधिक अभ्यास झाला आहे. तेथील कीड व्यवस्थापन पद्धतींवर आर्थिक व पर्यावरणीय परिणाम झाले आहेत. रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर परिणाम दिसले आहेत. अनेक वेळा ही कीडनाशके महाग असल्याने आफ्रिकेतील शेतकऱ्यांना ती परवडतही नाहीत. रासायनिक उपायांचा वापर कमी करताना एखादे पीक एखाद्या किडी वा रोगासाठी प्रतिकारक करणे हा पर्याय आहे; मात्र ही तशी सोपी गोष्ट नाही. मात्र, इंडोफाईट बुरशीचा आधार घेऊन पिकात एखाद्या किडीविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित करण्याचा पर्याय शास्त्रज्ञांनी हाताळला आहे. या बुरशीमुळे सूत्रकृमींसारख्या किडींविरुद्ध झाडात प्रतिकारक्षमता विकसित करणे शक्‍य असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या दिशेने केळी पिकात हे प्रयोग झाले आहेत.
मात्र, हे संशोधन नेदरलॅंड येथील वॅगनिनजन विद्यापीठातील डॉ. थॉमस डुबॉइस व अरनॉल्ड व्हॅन हुस यांनी केलेल्या संशोधनाला छेद देणारे असल्याने यावर आणखी अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या संशोधनामुळे महागड्या कीडनाशकांवरील खर्च बऱ्याच अंशी कमी होणार आहे. युगांडात उतिसंवर्धित केळींवरही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. तेथील शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होत असल्याचे आढळले आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकऱ्यांच्या 'मसिहा'चा गौरव

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील समौता गावामध्ये एक आगळावेगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये भात उत्पादकांनी फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार आणि "सब-1'जनुकाचे संशोधक डॉ. डेव्हिड मॅकील यांचा सत्कार केला. या सत्काराचे कारण म्हणजे भाताची "स्वर्ण-सब-1' ही जात या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येणारी ठरली.
बिहारमधील चंपारण या जिल्ह्यात दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका भात शेतीला बसतो, त्यामुळे भात शेतीचे नुकसान हे ठरलेले; परंतु या भागातील शेतकऱ्यांना भात लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे शेतकरी पुराच्या पाण्यात तग धरून राहील अशा जातीच्या शोधात होते. गेल्यावर्षी पुसा येथील (बिहार) राजेंद्र कृषी विद्यापीठाने चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "स्वर्ण-सब-1' ही जात लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. चंपारण जिल्ह्यात दरवर्षी किमान आठ ते 12 दिवस पुराचे पाणी शेतामध्ये थांबून राहते, त्यामुळे भात रोपे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; परंतु गेल्यावर्षापासून शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीची लागवड पूरग्रस्त भागात सुरू केली. ही जात पुराच्या पाण्यात तग धरून राहिली, तसेच पूर ओसरल्यानंतर रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांना या जातीपासून प्रति हेक्‍टरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. या जातीच्या तांदळाचा दर्जा चांगला आहे, त्याचबरोबरीने भातही लवकर शिजतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे "स्वर्ण-सब-1' ही जात शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या जातीच्या संशोधकाला भेटण्याची शेतकऱ्यांची इच्छा हाती, ती यंदाच्या एप्रिल महिन्यात पूर्णही झाली.
एप्रिल महिन्यात डॉ. मॅकील हे भारतातील संशोधन केंद्रांच्या दौऱ्यावर होते. हे शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जे. पी. सिंग यांच्या माध्यमातून भेटीचे आमंत्रणही दिले. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत डॉ. मॅकील 8 एप्रिल रोजी समौता गावात दाखलही झाले.
या वेळी चंपारण जिल्ह्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत खास समारंभात डॉ. मॅकील यांचा "शेतकऱ्यांचा मसिहा' म्हणून गौरव केला. या वेळी शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीच्या लागवडीचे अनुभव, तसेच भात शेतीमधील अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाताच्या जातींच्या निर्मितीमध्ये तशा पद्धतीने संशोधन सुरू असल्याची ग्वाही डॉ. मॅकील यांनी दिली.

पुरात तग धरणारी "स्वर्ण-सब-1'
आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार डॉ. मॅकील यांनी पुराच्या पाण्यातही तग धरून राहणाऱ्या "स्वर्ण-सब-1' या जातीची निर्मिती केली. ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी आठ ते 10 दिवस साचून राहते, त्या भागात या जातीची लागवड फायदेशीर दिसून आली आहे. जगभरातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीमुळे शाश्‍वत उत्पादनाची खात्री मिळणार आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

हवामानबदल वेलदोडा

हवामानबदल व तापमानवाढीमुळे जगभरात विविध समस्या निर्माण होताना दिसत असल्या तरी वेलदोडा पिकासाठी मात्र हा बदल फायदेशीर ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल नुकताच "हवामान बदल' विषयक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, वेलदोडा लागवड केलेल्या भागातील तापमानवाढीमुळे पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि सेंटर प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट, कयमकुलम (केरळ) येथील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे गेल्या 17 वर्षांपासून यावर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यातील निष्कर्षानुसार हवामानबदल व तापमानवाढीचा वेलदोडा, कॉफी, चहा आणि काळी मिरी या पिकांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळले. रात्रीच्या किमान तापमानात झालेली वाढ आणि दिवसाचे कमाल तापमान वाढल्यामुळे वातावरणात एकप्रकारे ऊब निर्माण होऊन त्याचा फायदा वेलदोड्याच्या उत्पादनवाढीसाठी तसेच काहीसा कॉफीच्या उत्पादनासाठीही होत आहे. याबाबत केरळ येथील वेलदोडा संशोधन केंद्राचे सहायक प्राध्यापक मुथुसामी मुरुगन यांनी सांगितले, की वेलदोड्याच्या उत्पादनात वाढ होण्यास गेल्या शतकापासून सुरवात झाली. 1990 मध्ये प्रति हेक्‍टरी उत्पादन 84 किलो मिळत होते. 1994 मध्ये त्यात वाढ होऊन प्रति हेक्‍टरी 136 किलो उत्पादन मिळू लागले. 2007 मध्ये हे उत्पादन प्रति हेक्‍टरी 300 किलो मिळाले. एनजालानी, पीव्ही-1 या जाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर ठरल्या. चहा आणि काळी मिरीच्या उत्पादनवाढीसाठी अनेक वर्षे काम करूनही त्यावर उपाय मिळत नव्हता, मात्र हवामानबदल व तापमानवाढीमुळे ते शक्‍य झाले आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पर्लस्पॉट माशाचे बीजोत्पादन

केरळमध्ये शेतीच्या बरोबरीने मत्स्यशेती हा पूरक उद्योग चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. त्यामुळे मत्स्यबीजांना देखील चांगली मागणी असते हे लक्षात घेऊन अथोली (जि. कोझिकोडे) येथील मनोज के. के. यांनी पर्लस्पॉट मत्स्यपालन आणि मत्स्यबीजोत्पादनातून चांगला रोजगार निर्माण केला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की पहिल्यांदा मी घराजवळील लहानशा शेततळ्यात टायगर कोळंबीच्या संवर्धनास सुरवात केली; परंतु "व्हाइट स्पॉट' रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोळंबीचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे मी नीमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकडे लक्ष केंद्रित केले. आमच्या तळ्यामध्ये पर्ल स्पॉट, मुलीट या जातीचे मासे चांगल्या प्रकारे वाढताना आढळले. या माशांना बाजारात चांगली मागणी असते. या मत्स्य संवर्धनासाठी पिरुवन्नामुझी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.

कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. बी. प्रदीप म्हणाले, की कोळंबी बीजोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लागते; परंतु श्री. मनोज यांच्याकडे असलेले शेततळे लक्षात घेऊन आम्ही कोळंबी बीजोत्पादनासाठी लहान टाक्‍या तयार केल्या. आमच्या सल्ल्यानुसार श्री. मनोज यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोळंबी बीजोत्पादनास सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी कोळंबीच्या 5000 नवजात पिल्लांची विक्री केली.

बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धत
कोळंबी बीजोत्पादनानंतर श्री. मनोज यांनी पर्लस्पॉट जातीच्या बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धतीचा अवलंब केला आहे. हा पिंजरा त्यांनी प्लॅस्टिकच्या जाळीपासून तयार केला आहे. शेततळ्यातील पाण्यात हा पिंजरा तरंगण्यासाठी त्यांना चारही बाजूने पीव्हीसी पाइपचा सांगाडा तयार केला. परंतु पिंजरा तयार करण्यासाठी पीव्हीसी पाइपचा खर्च वाढला. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. बूच लावलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जाळीच्या पिंजऱ्याला वरच्या बाजूला लावल्या. त्यामुळे हा जाळीचा पिंजरा पाण्यात योग्य पद्धतीने तरंगू लागला. जाळीचा हा पिंजरा 3 मीटर ु 1 मीटर ु 1 मीटर आकाराचा आहे. पी.व्ही.सी. पाइपचा वापर करून हा पिंजरा बनविण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु श्री. मनोज यांनी हा जाळीचा पिंजरा एक हजार रुपयांत तयार केला आहे. या पिंजऱ्याचा वापर करून दर हंगामात 20 हजार पर्लस्पॉट बोटुकलींची विक्री परिसरातील शेतकऱ्यांना केली. या कमी खर्चाच्या मत्स्यबीजोत्पादनातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

द्राक्षवेलीच्या वाढीकडे लक्ष ठेवा

सध्या पावसाळी वातावरण असल्याने द्राक्ष बागेत काही चांगल्या घडामोडी होत आहेत, तर काही ठिकाणी थोड्याफार समस्या दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागेत काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये घेत आहोत.

नवीन बाग :
पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढली आहे. ती आर्द्रता वेलीच्या शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; परंतु हीच आर्द्रता जास्त वाढली असल्यास आणि बागेत जर पाऊस असेल, नवीन फूट वाढत असल्यास अशा वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता राहील. या बागेत पाऊस झाला असल्यास नवीन फुटींवर थोड्याफार प्रमाणात करपा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करपा नियंत्रण फायद्याचे राहील.
ही फूट निघत असताना आपल्याला वाढीचा जोम जास्त दिसेल. या जोमाचा फायदा व्हावा म्हणून आपण ओलांड्यावर पुन्हा दोन ते तीन काड्या मिळतील. या दृष्टीने प्रयत्न करत असतो; परंतु जर वाढीचा जोम जास्त असेल तर वेलीमध्ये जिब्रेलीन्सचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होऊ शकतो. पुन्हा वातावरण जर ढगाळी असेल तर घडनिर्मिती होण्याकरिता बाधा निर्माण होऊ शकते.
वेलीची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आपण नत्र व स्फुरदची पूर्तता करतो, तेव्हा दिलेले अन्नद्रव्य व त्याचसोबत वाढती आर्द्रता यामुळेच बागेत वाढीचा जोम जास्त दिसतो. अशा परिस्थितीमध्ये बागेत नत्रयुक्त खताचा वापर काही काळाकरिता बंद करावा. याचसोबत अपेक्षेप्रमाणे घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने शिफारशीत संजीवकाचा वापर या वेळी महत्त्वाचा राहील.
बऱ्याचशा बागेत या वेळी पानावर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. रिकट घेतल्यानंतर बागेत पहिल्या वर्षी ही समस्या आढळून येते. यामध्ये लोह व मॅग्नेशिअमची कमतरता प्रामुख्याने दिसते. बागेत पाने पिवळी पडणे व पाण्याच्या कडा पिवळ्या पडणे या महत्त्वाच्या समस्या या वेळी बागेत आढळून येतात.
अन्नद्रव्यांच्या या कमतरतेमुळे बागेत वेल अशक्‍य होत असून, त्यानंतर वातावरणाचा समतोल बिघडला असल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कमी प्रमाणात फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेटची शिफारशीत मात्रेमध्ये दोन ते तीन वेळा फवारणी करावी. त्याचसोबत जमिनीतूनसुद्धा या घटकांचा पुरवठा करावा.

जुनी बाग :
या बागेत काडी परिपक्व होत आहे. काडी तळातून दुधाळ रंगाची होत असताना काडी परिपक्वतेकडे वळली आहे, असे आपण म्हणतो. ही काडी परिपक्व होण्याच्या दृष्टीने तारेवर काड्या बांधून घेणे महत्त्वाचे समजावे. यामुळे कांड्यामध्ये गुंतागुंती होणार नाही, म्हणजेच मोकळी कॅनॉपी असेल तर त्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. कॅनॉपीमध्ये मिळालेले हे वातावरण काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे आर्द्रता कमी झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्‍यता कमी राहील.
या वेळी बागेत पावसाळी वातावरणामुळे नवीन फुटींची वाढ जास्त होताना दिसून येईल. ही फूट जास्त वाढल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ शकतो. तेव्हा एकतर पालाशची पूर्तता करून काडी लवकर परिपक्व करून घ्यावी, म्हणजे वाढ थांबेल किंवा फुटी वेळीच काढून टाकाव्यात. यामुळे रोगावर नियंत्रण ठेवता येईल. जुन्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा या रोगावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सेझ आणि शेतकरी

ह्या देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर औद्योगिक कामकऱ्यांची गरज आहे. देशातील ६०% हून अधिक लोक शेतात काम करतात (आणि त्यातही ४०% लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळते!). हे सगळे हात देशाच्या आर्थिक समृद्धिला हातभार लावायला असमर्थ आहेत कारण रोजगार निर्माण करण्याच्या नावाखाली शेतजमिनीच्यामालकांना सरकार वाटेल त्या सवलती देते, पण ह्या सवलती घेउनही शेताचे उत्पादन वाढत नाही. अणि कसे वाढणार उत्पादन? देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षात दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही. शिवाय काम करणाऱ्यांपेक्षा काम मागणारे अधिक असल्यामुळे त्यांचे शोषण चालू आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त २% लोक शेतात काम करतात, आणि तरीही अमेरिकेचे धान्य उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे. ह्याचे कारण असे की जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जर शेती केली तर ती किफायती ठरत नाही. धान्याबरोबरच ह्या देशाला इतर साधनसामुग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडे नसल्यानेह्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर जर औद्योगिक कामाकडे वळवले तर देशाची परिस्थिती सुधारेल. औद्योगिक क्षेत्रात देशातले १२% लोक काम करतात आणि देशाचे जवळजवळ ३०% उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) काढतात. ह्याउलट, शेतकी व्यवसायात देशातले ६०% हून अधिक लोक काम करतात आणि केवळ १७% उत्पन्न काढतात. यावरून हे दिसून येईल की शेतावर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा, औद्योगिक मजुरांची उत्पादन क्षमता काही पटींनी अधिक आहे. सोपा हिशेब आहे: देशातल्या ४०% शेत कामकऱ्यांना जर औद्योगिक क्षेत्राकडे वळवले तर देशाचे उत्पन्न ३ पटींनी वाढेल. अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही, पण गेल्या ६० वर्षात नक्कीच करता आले असते. पण गांधीजींच्या भोंगळ कल्पनांमध्ये गुंतून देशाने आपले नुकसान करून घेतले आहे. शिवाय औद्योगिकीकरणामुळे शोषणही कमी होते, कारण औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग संघटीत आहे (लेबर युनियन्स), पण शेतमजुरांचे असे संघटन फार कमी प्रमाणावर बघायला मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकर्‍याला गाय

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला  नकोच.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकरी आणि आत्महत्या

मराटवाड्यातील सगळ्यात मागसलेला जिल्हा म्हणुन बीड जिल्हाची ओळख होते तिथे ना रेल्वे , ना कोनतच उद्योग , बहुसन्खय लोकांचा शेती किंवा उसतोड मजुर म्हणुन पश्च्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर उस तोडनी चि कामे करने , शेतातील पीक प्रामुख्याने बाजरी , ज्वारी , करडी , पाणी आसेल तर उस कींवा कापुस . माझे वय २८ , पण मला जसे कळायला लागले तसा एखदाही दुश्काळ पडलेला नाही . पण पाण्यासाटी वनवन हि आहेच ,शेतकरी हा प्रामुख्याने आपल्याच शेतात काम करतो शक्य तो दुसर्या च्या शेतात किंवा ईतर जागेवर काम करन्यास जात नाही कींवा टाळतो , याचे मुख्य कारन म्हनजे त्याची गावात आसलेली पत . कींवा पुर्वी पासुन आसलेली परंपरा मग शेतात आसे किती रुपयांचे पिक येते व त्यावर त्याचे कुटंब चालते का नाही ?
शेतकरी हा ज्यावेळस शेतात काम नसते त्या वेळेस दुसरी कामे का करत नाहीत .शेतात पेरणी केल्या नतंर , १ ते २ महिने मशागत करावी लागते , त्याच्या नतंर ४ ते ५ महीने शेतकरी घरीच बसुन असतात या वेळी घरातिल लग्न समारंभ किंवा ईतर कार्यक्रम करतात , शेतकर्याच्या घरात जर लग्न आसेल तर , ही शेतकरी आपल्या मुलिला हुन्डा म्हणुन , १००००० रु वा या पेक्षा जास्ती जास्त देतात किंवा मुलासाठी घेतात .
वरति सोने , घरात लागनार्या वस्तु , ईतर काही , किंवा बाईक वगरे .
याचे कारन म्हण्जे शेतकर्या च्या गावातली परंपरा , लग्ना च्या वेळी सगळ्या गावात चुल बन्द आमन्त्रन आसते गावची लोकस्न्ख्या कमीत कमी १००० किवा जास्ती जास्त किती ही , परत मुलाकडची मन्डळी ट्र्कनेच लग्नासाटी येतात , कमीत कमी २ ट्र्क किवा जास्ती जास्त किती हि, हे सारे कर्ताना शेतकरी शक्यतो गावातिल एका मोट्या शेतकर्या कडुन व्याजाने रुपये घेतो ,
मग व्याज व मुद्दल त्याच्याकडुन फेडले जात नाही , तो व्यतित होतो व व्यसानाच्या आहारी जातो , व्यसानाच्या आहारी गेल्या नन्तर काही दिवसानी त्याच्या आसे लक्षात येते कि आपली दुसरी मुलगी कींवा मुलगा लग्नाच्या वयात आला आहे , मग तो शेती विकुन लग्न कर्तो ,राहिलेल्या शेती वर त्याची उपजिवीका होत नाहि व शेतकरी बाहेर हि कामाला जात नाही ....?
आता अनुदानाची गोष्ट सागतो , भहुसन्ख शेतकर्या अनुदान मिळते च मग शेतकरी हि आनेक प्रकरने सरकारी कर्याल्यात खोटिच दाखवतो ,आती वॄष्टि झालि यांना अनुदान , कमी पाउस यांना अनुदान , पिकावर रोग पडला यांना अनुदान, सारकारी आधिकारी ही थोडे फार पैसे घेउन फाइल मन्जुर करतात .
विविध बॅन्केचे काढलेल कर्ज हि तो फेडत नाही .अनुदाने , कर्ज , काढुन तो पैसे स्त्कार्याला लावत नाही ,
त्या पैस्यातुन तो मुला करीता बाईक घेतो , पत्ते खेळतो दारु पितो , देवाच्या वारया करतो , व ईतर ही गोष्टी करतो .
शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुरच काम करतात , मि ज्या वेळी गावाकडे जातो त्या वेळेस शेतकर्या चि ही मुले आपल्या गाडीवर फिरत आसतात .
शेतकरी हि शेतापेक्षा ईतर जागेवच जास्त वेळ घालवतात , आज हि मी सांगु शकतो कि शेतकर्या च्या शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुर च काम करतात , तिसरे कारन शेत मजुर एक वेळेस उपाशी राहिन पण आपल्या मुलाला शिक्षण देइल , शेतकर्या चे तसे नाही मुलगा शिकला तर शिकला नाही तर आहे आपली शेती आहेच , माझेच उद्दा देतो माझ्या गावात माझ्या वयाची १६० मुले आसतिल पण त्यातिल फक्त मी गावाच्या बाहेर शक्षिण घेतले जवळ पुरेसे पैसे नसतांना हि लोकांच्या मदतिवर ,मग हि मुले शिक्षण का घेत नाहित , याचे मुख्य कारन शेति कींवा त्यांचा पुर्वि पासुन आसलेला समज कि आपल्याला काय कमी आहे . शेत मजुराचे तसे नाही त्यांच्या कडे उपजिवीके चे साधन नसते त्या मुळे ते आपल्या मुलाला शिक्षण देतात आणि ति मुले आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज हि करतात , आसो.......
ज्या शेतकर्या कडे सुरवातिला ५ एकर जमिन होती आता त्यांच्याकडे १ एकर हि राहिलि नाही , कारन कुटंबाचा केलेला विस्तार , शेतकर्याला कमित कमी २ आणि जास्तीत जास्त ५ ते ६ मुले आसतात , एकत्र कुटुंब पध्दत आता खेडयात ही राहिली नाही , त्या मुळे त्याच्याकडे आसनार्या शेताची विभागनी होते ,
मग १ एकरात आसे किती पिक येनार , त्यात त्याचे घरही चालत नाही व तो दुसरी कडे कामाला जात नाही . आसे होत आसतांनाच त्या शेतकर्या च्या घरचे एखादे लग्न कींवा एखादा समारंभ निघतो व तो पुन्हा कर्जा ने पैसे काढतो व ते फेडता नाही आले कि आपली आहे ति शेती विकुन टाकतो मग पुढे काय ....
आजकाल तर शेतकरी कोणत्याही बँकचे कर्ज हि फेडत नाही उलट कर्ज माफीची वाट पाह्तो , कींवा सरकारी अनुदाने लाटत आसतो , खोटी कागद पत्रे सादर करुन .
तुम्हाला जर हे खोटे वाटत आसेल तर तुम्ही प्रत्यक्ष कधितरी मराटवाडयातील एखादया खेडे गावात जाउन यावे .
सरकार भरपुर अनुदान देते उदा : गाई , मह्से, शेळी , कोबडी , मत्सपालन , वुर्क्ष रोपन , यावर सरकार अनुदान देते , पन शेतकरी काय करतात ज्यावेळेस बँकेचे कींवा सरकारी आधिकारी चोकशी साठी येतात त्या वेळेस शेतकरी दुसरयाचिच , गाय , शेळी दाखवुन बँके चा पैसा उचलतात सरकारी आधिकारी ही थोडेफार पैसे घेउन फाइल मंजुर करतात.
मग शेतकरी घेतलेल्या कर्जतुन ना शेतीला पुरक व्यावसाय करतो , ना बॅंकेचे कर्ज फेडतो यातच तो कर्जबाजारी होतो मग पुढे काय ......
पण माझ्या गावात आसेही काहि शेतकरी आहेत की ज्यांना ना अनुदान मिळते ना कोनत्या बँकेचे कर्ज मिळते
बिचारे ६ महिने शेतात काम करुन उरलेले ६ महिने उसतोडनी साठी जातात आणी त्यातुन आलेल्या पैसे तुन आपल्या मुला मुलीचे लग्न करतात.
बरे शेतकर्याने आत्महत्या केली तर त्याचि खरी कारने शोधली जात नाहित
उदा :
१ ) शेतकर्याने का आत्मह्त्या केली ?
२ ) त्याने कोणत्या बँकेचे कर्ज काढले होते , व ते कशासाटी काढले , ज्याच्यासाठी काढले त्याचा त्याने त्याच कारना साठी उपयोग केला होता का ?
३ ) त्याने कर्ज कधी काढले , बँकेचे हाफ्ते भरले होते का ?
४ ) कर्ज काढल्या पासुन त्याने शेतात कोणकोणती पिके घेतली होती , व ति पिके वाया गेली होति का ?
५ ) शेतकरयाला कोणते व्यसन होते का ?
६ ) शेतकर्या च्या कुटुंबात कीती व्यक्ति आहेत , व ति कोणती कामे करतात , कि घरीच बसुन आसतात ?
७ ) शेतकर्या चे घरातील काही प्रोबलेम होते का ?
८ ) शेतकर्या ने नेमके कशासाटी कर्ज काढले होते ?
९ ) शेतकर्याने या आधि जमिन विकली होती का व का विकली कारने दया ?
१० ) शेतकर्याच्या घरात एखादे लग्न , कींवा एखादे मोटा समारंभ झाला आहे का ?
वरिल कारना चा विचार न करता शेतकर्या ने आत्मह्त्या केली , ति कशामुळे , का , याचा शोध न घेता लगेच त्याने कर्जा मुले आत्मह्त्या केलि आसे म्हणुन विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष त्यावर राजकारण करतात .
बरे शेतकर्याने शेतिसाठी कर्ज काढले तर ते कोनत्या कारना साठी
उदा :
१ ) बि बियाने , खते , किटक नाशके ,
२ ) नागरनी , फवारनी
३ ) मशागत , शेतमजुरी
४ ) विद्दुत पंप , कींवा शेतात पाइप लाईन
५ ) विद्दुत जोडनी
६ ) बैल , गाय , शेळी, म्हैस , कोबडया , मत्स पालन , इत्यादी साठी .
७ ) विहीर कींवा बोअर घेने
८ ) ट्रक्टर , बैलगाडी , व इतर आवजरे
याची पण पडताळनी व्हायला पाहिजे ............
आसो मि हे सर्व काही शेतकर्या चा विरोधक म्हणुन नाही लिहले हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत
आमच्या कडे ५ एकर शेती होती ति कोनत्या कारना साठी विकली तर , माझ्या बहिनी चे व चुलत बहिनी चे लग्न , शेती विकुन माझे आई वडिल आता दुसर्या च्या शेतात शेतजुर म्हणुन जातात कींवा उसतोड मजुर म्हणुन साखर कारखान्यावर जातात .
खरोखरीच शेतकरी का आत्मह्त्या करतो , याची खरी कारने शोधली पाहिजेत कर्ज माफी कींवा अनुदाने हा त्या वर चा उपाय नव्हे आपय आहे ?
काही खरी माहिती ..
१ ) शेतकर्याच्या कोनत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही , त्यामुळे दलाल शेतकर्या कडुन शेतिमाल कमी भावाने विकत घेउन शहरा च्या ठीकाणी कित्तीतरी आधिक भावाने विकतात .
२ ) शेतमालाची बाजारपेठ शेतकर्या च्या हातात नाही तिथे मारवाडी कींवा ईतर लोक आसतात .
३ ) जसे भारतात कोनत्याही वस्तुची फिक्स कींमत आहे तर मग शेतीमालाचिच का नाही .
उदा : कांदे १० रुपये किलो आहेत तर संपुर्ण भारतात १० रुपये किलो ने विकली गेली पाहिजेत आज कसे होते शेतकर्या कडुन ३ रुपये किलो ने कांदे घेउन ति १५ रुपये कीलो ने विकली जातात महण्जे फायदा कोनाचा ?
मि पुण्यात राह्तो ज्या वेळेस मी गावाकडे जातो त्या वेळेस वांगी , कांदे , भेंडी , टॅमाटो , ईतर भाजिपाला खुप झालेतर , ५ रुपये कीलो मिळतो कधी कधी तर २ कींवा ३ रुपये कीलो ने मिळतो मग शहरा च्या ठीकानीच का १५ ते ५० रुपये कीलो ने मिळतो महण्जे फायदा कोनाचा ,
आशी खुप कारने आहेत पण एक मत्र खरे , शेतकर्याने कष्ट करुन शेतीत माल पिकवला तरी तो त्या शेतमालाची व त्याच्य कष्टाची किंमत टरवु शकत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल, ति कींमत सरकरी आधिकारी , दलाल कींवा तुम्ही आम्ही ठरवतो .
४) साखरकारखाने ही उसाचे राजकारण करतात , एक कारखाना उसाला १५०० रुपये भाव देतो तर दुसरा कारखाना उसाला ६०० कींवा ७०० रुपये भाव देतो , मग मला प्रश्न्न पडतो की १५०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर पांढरी आसते आणी ६०० कींवा ७०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर काळी आसते का ?
कधीकधी तर ही साखरकारखाने शेतकर्या चा उस शेतातच राहुन देतात कारन काय तर तो आमुक तमुक पार्टीचा माणुस आहे , गरीब शेतकर्यांचे तर हाल विचर्याला नको .
५ ) महाराष्ट्रातील साखरकारखाने , कॄषीउत्तपंन्न बाजार समीती , भु विकास बँक , जिल्हा सहकारी बँक ,
या संस्थाशी शेतकर्या जास्त सबंध येतो पण या संस्था कोनत्या कोनत्या राजकीय पुढारयाच्या ताब्यात आसतात , म बँक , कारखाना तोट्यात चालतो आहे आसे दाखवुन त्यावर सरकारी पॅकेज मीळवायचे , ते पॅकेज स्वता: कडेच ठेवायचे शेतकर्याचे काय तो त्याचा काही करेल
मुळात महाराष्ट्रातील कोणतीच सह्कारी संस्था तोट्यात चालत नसावी पण सह्कार खात्याला लागलेली भ्रष्टाचारी नेत्याची धुळ ....
दिंनाक : ८/०९/०९ रोजी , लोकमत या र्वतमान पत्रात शेतकर्यांच्या आत्मह्त्या संबधी आलेली माहीती देत आहे .
सहा वर्षात बीड जिल्हायातील ३८२ शेतकर्याच्या आत्मह्त्या .
बीड , दि. ७ बीड जिल्हात गेल्या सहा वर्षात ३८२ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यातील ११९ शेतकर्यांच्या आत्मह्त्या या कर्जबाजारीला कंटाळुन झाल्याचे सिध्द झाले आहे . १११ जणांच्या वारसांना शासनाची एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर आट जणांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु आहे .
जिल्हाधिकारी भारत सासने यांच्या उपस्थितीत सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या आत्मह्त्या संदर्भात बैटक झाली. यात उर्वरित प्रकरणांवर चर्चा झाली . कायमस्वरुपी दुष्काळी हे बिरुद चिटकलेल्या बीड जिल्हात शेतकर्यांच्या आत्मह्त्येचे लोण पसरले आहे गेल्या सहा वर्षात ३७८ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यात २००४ सली ११ जणांच्या आत्मह्त्या केल्या. त्या पैकी एक ही आत्मह्त्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे . तर २००६ या एकट्या वर्षात जिल्हात १२४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या झाल्या आहेत . या पैकी फक्त २३ आत्महत्या प्रशासकीय मदती साटी पात्र ठरल्या तर १०१ प्रकरणात कर्जबाजारीपणामुळे नसल्याचा शेरा प्रशासनाने मारला.
२००७ यावर्षात आत्मह्त्येचा सिलसिला कायम राहीला .याही वर्षी एकुण ९५ जणांनी आत्मह्त्या केल्या . पैकी ३९ प्रकरणात वारसांना शासकीय मदत मिळाली तर ५६ प्रकरणे नाकारण्यात आली . २००८ यावर्षी ८६ जणांनी आत्मह्त्या केल्या त्यातील ४४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या मदती साठीग्राह्य धरुन उरलल्या ४२ प्रकरणात आत्मह्त्याचे कारण कर्ज बाजारीपणा नसल्याचे नमुद केले . २००९ वर्षात ५४ जणांच्या आत्मह्त्या झाल्या . यातील १४ जणांच्या वारसांना मदत मिळाली तर ३२ प्रकणे आपात्र टरविण्यात आहेत ४ शेतकर्यांचे अहवाल अद्दाप नाहीत
२००९ या चालु वर्षात आत्मह्त्या केलेल्या ४ प्रकणांचा अहवाल अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही . या बाबत पोलिस आणि प्रशासन चोकशी करीत असुन अहवाल मिळाल्यानंतर ती प्रकरणे चर्चेसाटी येणार आहेत .
वरील माहीती जशासतशी मी दिली आहे ,
म्हण्जे सहा वर्षा कर्जबाजारीपणा मुळे फक्त ११९ शेतकर्यांने आत्मह्त्या केल्या बाकीच्या शेतकर्याची २६३ शेतकर्याची आत्मह्त्येची कारणे कोनती ? आणी ते कोनशोधनार ..
आसो माझी ही माहिती सर्व शेतकर्या चि आहे आसे नाही , काही शेतकरी आपल्या कष्टा ने आगदी खडक माळावर ही पीके घेतात . काही बीच्यारे शेती आसुन ही उपाशी राह्तात , काहीच्या शेतात तर काहीच पीकत फक्त नावाला शेती .
मायबोली वर पहीलाच प्रयत्न

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll